ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, November 23, 2009

१३. काही कविता: ६ ग्वाही

कविता लिहिणं -  ही ज्यावर आपलं कसलंही नियंत्रण नसतं अशी कृती आहे. किंबहुना ती एक स्वतंत्र अशी प्रक्रिया असते, ती एक पूर्ण घटना असते. कधीकधी त्याचं मर्म हाताशी येतं, तर कधी ते निसटून जातं. आणि मागे उरते ती फक्त एक गुदमरवणारी अस्वस्थता. 

लिहिणं आणि न लिहिणं यापैकी कोणताही पर्याय निवडला तरी - तो परिस्थितीनुसार निवडावाही लागतो अपवादात्मक वेळी - त्याचा परिणाम एकच असतो. तो म्हणजे काहीतरी मिळवल्याची आणि ते गमावल्याची क्षणिक का असेना पण तीव्र भावना.

सगळयाच कवींना अस वाटत असेल असा माझा अजिबात दावा नाही.
कदाचित याच्या पूर्ण विरोधी असाही मुद्दा मी कधीतरी लिहिन.
कवितेचा आणि तर्काचा logic चा संबंध क्वचितच असतो म्हणून कदाचित मनासारख्या गोष्टीवर आपण असंख्य ओळी लिहू शकतो आणि तरी ते ओळखीचं होतंच नाही बेटं!

श्वास अर्ध्यातच
थांबतो कधीकधी,
हे नको, तेही नको
म्हणतॊ, शोध पर्याय काही....


लटपटते मन, शरीर
यांची साक्ष अटळ
आणि दुनियादारीत
फक्त दुःखाचीच ग्वाही....

पुणे, ३० नोव्हेंबर २००८

No comments:

Post a Comment