आज नानाआजोबा आले. तालुक्याला असत्यात.
आज्जीचे कायतरी भाऊ हायेत ते.
आजोबा आले की आई मला काम सांगणार.
पल्याडच्या गल्लीतल्या वाण्याच्या दुकानातनं कापी आणायची.
हे आजोबा च्या पीत न्हाईत, कापी पितेत.
“आजोबा, तुमी चा का न्हाई घेत? काय हुईल का तुमाला? ” म्या उगं इचारलं.
“ बाळ अंजली, बापूजींनी सांगितलं देशासाठी थोडा त्याग करा.
तेंव्हापासून चहा सोडला.” आजोबा म्हन्ले.
भौतेक ते गांधी जैंतीवाले बापूजी असत्याल.
कदी मीठ घ्या म्हन्तेत, कदी चा सोडा.
आजोबा चा सोडले, तेचा बापूजींना काय उपेग?
असंल कायतरी. जौंदे.
हेंनी चा सोडला, कापी पकाडली.
येक सोडलं की दुसरं कायतरी पकडायचं.
म्या असं काय केलं की आज्जी
म्हन्ते “धरसोड”.